उन्हाळ्यात कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर/गुणकारी आहे Fruits in marathi

उन्हाळ्यात कोणते फळ आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर/गुणकारी आहे.

Fruits उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते.परिणामी जास्त जेवनही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणाऱ्या प्रोटिन्स,कॅल्शिअम आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणे,लवकर थकून जाणे या गोष्टी जाणवतात.अशावेळी फळे खाल्ली तर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होते.उन्हाळ्यामध्ये कोणते फळे खावेत हे आरोग्यासाठी जाणून घेऊया.

उन्हाळ्यात कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर/गुणकारी आहे Fruits in marathi

आंबा

या फळाला फळांचा राजा म्हटले जाते. आंबा आपल्याला खायला मिळावा यासाठी आपण उन्हाळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करतो. भूक वाढविणे हा त्याचा प्रमुख गुणधर्म आहे. कैरी गलिक ऑसिड मुळे आंबट लागते. पण जेव्हा कैरी चे रूपांतर आंब्यात होते, तेव्हा शरीरात गेल्यानंतर जीवनसत्व अ मध्ये परावर्तित होते,तसेच आंब्यातून क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते. आंबा शक्तिवर्धक आणि स्फूर्तीदायी आहे.उपाशी पोटी आंब्याचा सेवन करणे टाळाव.

कलिंगड

दिवसभर काम केल्यानंतर आणि फिरल्यानंतर तहान भागवण्यासाठी कलिंगडाचा आपण आधार घेतो. कारण कलिंगड मुळात थंड आणि पाणीदार असल्याने त्याच्या सेवनाने आपली तहान भागवली जाते. यात क आणि अ जीवनसत्त्वे असतात. याशिवाय बी6 आणी ब 1 मग्नेशियम, पोटॅशियम सारखे खनिज पदार्थ आहे. त्याचा सेवन केल्याने उन्हाचा त्रास कमी होतो.

खरबूज

यात व्हिटॅमिन अ आणि पोटॅशियम सारखे खनिज पदार्थ आहेत.याचं सेवन केल्याने उन्हाचा त्रास कमी होतो पण याच अधिक सेवन केल्याने पोट आणि आतडी कमजोर होतात.तसंच खरबूज खाल्ल्यानंतर किमान दोन ते तीन तास दूध घेणं टाळावे.

जांभूळ

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. Fruits उन्हाळ्यात होणाऱ्या अतिसार च्या त्रासांवर उपाय म्हणून जांभळ खाव. जांभळातही पाण्याच प्रमाण जास्त असल्यामुळे ते उन्हाळ्यात उपयुक्त ठरते. कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते अनेक रोगांवर गुणकारी आहे. हे फळ नेहमी जेवणानंतर खावं.

द्राक्ष

द्राक्ष या सगळ्यात मस्त फळ आहे कारण ते फळ खायचे असेल तर त्याला सोलण्याची गरज नसते. द्राक्ष धुतले के पटापट खाता येतात. लहान आणि मोठे हे फळ हौसेने खातात.द्राक्षांमध्ये मुबलक प्रमाणात ग्लुकोज असते.

आवळा

आवळा हे फळ बहुगुणी आहे. उन्हाळ्यात सतत पित्त खवळत. त्याच्यावर उपाय म्हणून आवळ्याचं सरबत प्याव. कारण आवळा पित्तशामक आहे.आवळ्याचा रस,जिरं आणि खडीसाखर यांचे मिश्रण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. Fruits आवळा आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीच्या जळजळी पासून मुक्तता मिळते.तसंच लघवी साफ होते.

Leave a Comment

x